देशाच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केलेले आहेत. यामध्ये महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. आता ही मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे. तसेच शेतकरी आता 1 एप्रिल 2025 पासून 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज करू शकणार आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? तसेच त्यासाठी अर्ज कसा करावा? याबद्दलची माहिती.
शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते-
अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केलेल्या आहेत. त्यामध्ये शेतीसाठी देखील अनेक नवीन घोषणा केलेल्या आहेत. यातीलच एक घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे. ही मर्यादा 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा सहज पूर्ण होतात. तसेच जर वेळेत कर्जाची परतफेड केल्यास सरकार व्याजावर 3 टक्के सूट देखील देते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होते.
किसान क्रेडिट कार्डची रक्कम शेतीसाठी कशा प्रकारे दिली जाते-
KCC शी लिंक केलेल्या RuPay कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ATM मधून पैसे काढता येतात. तसेच डिजिटल पेमेंट देखील शेतकरी करू शकतात. त्याचबरोबर KCC धारक शेतकऱ्यांची पिके प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून समाविष्ट केली जाऊ शकतात. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके व डीएपी खरेदी करण्यासाठी KCC मर्यादेचा वापर करता येतो.
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?-
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी पद्धत खूप सोपी आहे. त्यासाठी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज हा कोणत्याही बँक, लघुवित्त बँक व सहकारी बँकमध्ये करता येतो.
किसन क्रेडिट कार्डचे फायदे-
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 4 टक्के व्याज दराने 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळत होते परंतु आता या मर्यादेत वाढ करून 5 लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळते. तसेच जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडत असेल तर त्याला 3 टक्के अनुदान मिळणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते?-
किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. परंतु योजनेमध्ये कमाल वयाची मर्यादा देण्यात आलेली नाही. आता सरकार या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचे कर्ज देणार आहे. हे कर्ज 5 वर्षापर्यंत घेता येते. किसान क्रेडिट कार्डची वैधता देखील पाच वर्षापर्यंत आहे.
किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
किसान क्रेडिट कार्डचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल असणे गरजेचे आहे. तसेच याशिवाय जमिनीच्या मालकीचा/भाडेकराराचा पुरावा हा शेतकऱ्यांच्या नावावरील जमीन अभिलेख असावा. जर शेतकरी भाडेकरू असल्यास भाडेकराराची वैध कागदपत्रे असावीत. हे सुरक्षित कर्ज असल्याने शेतकऱ्यांना कर्जाच्या रकमेइतकेच तारण गरजेचे आहे.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.