ई-पीक पाहणी करण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी?
शासनामार्फत रब्बी हंगामातील पिकांची अधिकृत नोंद व्हावी, यासाठी ई-पीक पाहणी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी 24 जानेवारीपर्यंत पिकांची ऑनलाईन नोंद पूर्ण करणे गरजेचे आहे. मुदतीत नोंदणी न केल्यास सातबाऱ्यावरील पिकाचा रकाना कोरा राहणार आहे. त्यामुळे भविष्यात पीक विमा त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. महसूल विभागामार्फत ई-पीक …




