मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या चालू वीज बिलाच्या पहिल्या हप्त्याचा सरकारद्वारे भरणा.

सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 25 जुलै 2024 रोजी GR देखील काढण्यात आलेला होता. या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी 7.5 एचपी म्हणजेच अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप वापरतात त्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा फायदा हा 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 या दरम्यान लागू केली जाणार आहे.

शासनाच्या दिनांक 25 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचे माहे एप्रिल ते जून 2024 या कालावधीच्या चालू वीज बिलाच्या पहिल्या हफ्त्याचा भरणा करण्यात आला आहे. तसेच उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे यापुढील बिलांमध्ये बळीराजा मोफत वीज योजनेची रक्कम अशीच जमा होत राहील, असे देखील चालू वीज देयकाच्या पावतीमध्ये म्हटले आहे.

सरकारला वीज बिलाचे भरावे लागणार 14761 कोटी रुपये-

महावितरण खात्याला सरकारला या बिलाचे 14761 कोटी रुपये एवढी रक्कम द्यावी लागणार आहे. कृषी पंप विज बिलाची एकूण थकबाकी ही 50 हजार कोटी रुपये इतकी आहे. या वीज बिल माफीसाठी जो खर्च येणार आहे तो खर्च राज्य सरकार उचलणार आहे. म्हणजेच सरकारला दरवर्षी महावितरणाला 14 हजार 761 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे लागणार आहे.

आपल्या राज्यात मार्च 2024 अखेरपर्यत47.41 लाख एवढे कृषीपंप ग्राहक शेतकरी आहेत. म्हणजेच एकूण वीज ग्राहकांचा तुलनेत हे प्रमाण 16 टक्के आहे व 30 टक्के वीज कृषीपंपांसाठी वापरण्यात येते. कृषी ग्राहकांचा सध्या स्थितीचा एकूण वार्षिक वीज वापर हा 39 हजार 246 दशलक्ष युनिट आहे. राज्यातील कृषी पंपांसाठी रात्री 8/10 तास किंवा दिवसा 8 तास वीजपुरवठा करण्यात येतो.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *