आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक!
महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्री सन्मान व स्त्रियांच्या हक्काच्या दृष्टीने शासनाच्याद्वारे नेहमीच कोणती ना कोणती भूमिका घेतली गेलेली आहे. घराच्या मालकीमध्ये महिलांच्या नावाची नोंदणी करून पती व पत्नी हे दोघेही संयुक्त मालक असावेत यासाठी महाराष्ट्रात मोहीम राबवली गेली आहे. याच धर्तीवर राज्य शासनाच्या मार्फत सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे देखील नाव प्राधान्याने नोंदवले जावे यासाठी निर्णय घेतला गेला होता. …




