प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आज म्हणजे दिनांक 15 जुलै ही शेवटची मुदत होती. परंतु राज्यातील बरेचसे शेतकरी अजूनही काही कारणांमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे त्या शेतकऱ्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मदत वाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. …




