आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू?
राज्यांमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना ही वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्याला आर्थिक संरक्षण देण्याच्या हेतूने राबवली जाते. खरीप हंगामासाठी विमा योजनेमध्ये भाग घेता येणारी पिके- भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना यामध्ये सह्भाग नोंदवता येणार आहे. …




