आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींना हप्ते न मिळण्याची कारणे पाहणार आहोत. भरपूर लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, याचे कारण म्हणजे शासनाकडून कडक कारवाई करण्यात आलेले आहे. त्यामुळे भरपूर महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. चला तर मग अपात्रतेची कोणकोणती कारणे आहेत, ते आपण जाणून घेऊयात.
अपात्रतेची कारणे-
- ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत.
- ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, त्या महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेतात. त्याचबरोबर रु.2.50 लाख पर्यंत उत्पन्न असणारे बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार व कंत्राटी कर्मचारी पात्र असणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा की, ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त असलेल्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.
- या योजनेसाठी अर्ज करणारी लाभार्थी महिला ही शासनाच्या इतर विभागा मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा रु.1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहेत, त्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत, त्या कुटुंबातील महिला देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
WhatsApp Group
Join Now