देशाची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की, आता राहिला देखील जागा शिल्लक नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये जमिनीवरून होणारे वाद काही नवीन नाहीत. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जमिनीचे वाद कोर्टापर्यंत गेलेले आहेत. आजही अनेक प्रकारने कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये मुख्यतः जमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद पाहायला मिळतात. शेत जमिनीची वाटणी करताना कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागत असते. वारसांमध्ये जमिनीच्या मालकीबाबत वाद उद्भवू शकतात, त्यामुळे वाटणीची गरज ही भासत असते. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया शेत जमिनीची वाटणी कशी करावी? व त्याचे नियम काय आहेत?
शेत जमिनीची वाटणी कशी करण्यात येते?-
- वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करताना भाऊ, बहीण व आई यांच्यामध्ये वाटणी करण्यात येते.
- वडिलांच्या हयातीत त्यांची इच्छा नसेल तर ती वाटणी होत नाही.
- वडिलांच्या नंतर ही जमीन त्यांची स्वकष्टार्जित असेल तर मृत्युपत्र करून कोणालाही ते देऊ शकतात.
- जर जमीन वडीलोपार्जित असेल तर वाटणी करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो.
- न्यायालयाकडून करण्यात आलेले जमिनीची वाटप रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करावी लागत असते..
- या याचिकेमध्ये वाटप रद्द करण्याची मागणी करण्यासाठी कायदेशीर मुद्दे व पुरावे देखील सादर करावे लागतात.
जमीन वाटपाच्या पद्धती-
- पहिला मुद्दा असा की जमिनीच्या मालकाचा जर मृत्यू झाला असेल तर त्यावेळी जर मृत्युपत्र तयार नसेल तर ती मालमत्ता त्याच्या कायदेशीरित्या वारसांकडे हस्तांतरित करण्यात येते.
- यामध्ये प्रामुख्याने बायको व मुलांचा समावेश असतो. प्रथमत: जमिनीच्या रा सातबाऱ्यावरती नाव नोंदणी करण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज सादर करावा लागतो.
- जर सर्व वारसांनी एकत्रित मालमत्ता स्वीकारली असेल, तर त्यांची नोदी एकत्र करण्यात येते.
- परंतु प्रत्येकाला स्वतंत्र मालकी पाहिजे असेल तर खातेफोड प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. जर सर्व वारसांची संमती नसेल तर त्यासाठी न्यायालयात दावा देखील दाखल करता येतो.
- तर शेतीच्या जमिनीच्या वाटणीसाठी वारसदार तहसीलदार किंवा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येतो.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- जमिनीचा वारस असल्याचे प्रमाणपत्र
- वारस नोंदणीचा अर्ज
- मिळकत नोंदणी कागदपत्रे
- अर्ज दाखल केला की मग सर्व वारसांना नोटीस पाठवण्यात येते व त्यांची बाजू ऐकली जाते. त्यानंतर कागदपत्रांची खातरजमा करून न्यायालय जमिनीच्या वाटणीबाबत अंतिम निर्णय देत असते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढची प्रक्रिया काय असते?-
- शेतजमिनीच्या वाटणीच्या न्यायालयीन निर्णयानंतर स्थानिक तलाठी अधिकाऱ्यास जमीन वाटणीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात येते.
- उपलब्ध जमीन व वारसांची संख्या यानुसार प्रत्येकी किती वाटा मिळणार याचे नियोजन तलाठी करतो. यामध्ये प्रत्येक माणसाला स्वतःच्या जमिनीपर्यंत रस्ता मिळेल याची देखील खातर जमा करण्यात येते.
- सर्व वारसदारांची संमती घेतल्यानंतर महसूल विभागामार्फत अंतिम मंजुरी देण्यात येते. जर वारसांना तलाठ्याचा निर्णय मान्य नसेल तर अंतिम निर्णय हा महसूल अधिकारी किंवा न्यायालयाकडून घेण्यात येतो.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
WhatsApp Group
Join Now