अनेकदा शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याची तक्रार व पारंपारिक वीज कनेक्शनवरील वाढता ताण यावर उपाय म्हणून महावितरणकडून आता दिवसा वीस पुरवठा व्हावा, यासाठी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून वीज कनेक्शन दिले जातात. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. महावितरणच्या या योजनेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येते तर एससी, एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान दिले जाते. राज्यात पारंपारिक कृषीपंपाचे 90 ते एक कोटीपर्यंत कनेक्शनधारक आहेत.
दरवर्षी 55 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी नियमित वीजबिल भरत नसल्यामुळे आठ-दहा वर्षांमध्येच शेतकऱ्यांकडे शेतीपंपाची थकबाकी ही 60 हजार कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे वीज निर्मितीचा खर्च हा महावितरणला कर्ज काढून भागवावा लागत आहे. यामुळे आता शेतीपंपासाठी नवीन पारंपारिक कनेक्शन नाही देण्याची भूमिका महावितरणने घेतलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना नवीन कृषी पंपाचे कनेक्शन घ्यायचे आहे, त्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा अर्ज https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन करून कनेक्शन घेता येणार आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर एका महिन्यात हे कनेक्शन मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘सौर कृषीपंप’ योजनेचे अनुदान-
- अडीच एचपी- अडीच एकरासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कनेक्शनसाठी 10 टक्के रक्कम भरून म्हणजेच 22,971 रुपये भरावे लागतात. तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून म्हणजेच 11,486 रुपये भरावे लागतात.
- पाच एचपी- पाच एकरासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर पॅनल उभारून कृषीपंपाचे कनेक्शन घेण्यासाठी 10 टक्के रक्कम भरून म्हणजेच 32 हजार 75 रुपये तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून म्हणजेच 16 हजार भरावे लागतात.
- साडेसात एचपी- पाच एकरावरील खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर पॅनल उभारून कृषीपंपाचे कनेक्शन घेण्यासाठी 10 टक्के रक्कम भरून म्हणजेच 44 हजार 939 रुपये भरावे लागतात. तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम म्हणजेच 22 हजार 65 रुपये भरावे लागतात.
या योजनेच्या माध्यमातून 25 वर्ष वीजबिलापासून मुक्ती-
‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. शेतकऱ्यांना दिवसा व रात्री दोन्ही वेळेस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही, त्यामुळे 25 वर्षे टिकणारे सौर पॅनल असल्याने तेवढे वर्ष विजबिल येणार नाही. तसेच पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती मोफत मिळणार आहे. या योजनेमुळे आता पारंपारिक विजेचे नवीन कृषीपंपांना कनेक्शन देणे बंद करण्यात आलेले आहे.
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.