आता घरीबसल्या रेशन कार्ड ई-केवायसी करा तेही फक्त काही मिनिटांमध्ये?

शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे. ई-पॉस मशीनद्वारे स्वस्त धान्य दुकानातून ई-केवायसी केली जात आहे. परंतु लहान मुले व वृद्ध लोकांच्या बोटांचे ठसे व डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने NICच्या सहकार्याने Mera E-KYC हे अ‍ॅप सुरू केलेले आहे. आता लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांमध्ये स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची ई-केवायसी प्रक्रिया घरी बसल्या पूर्ण करता येणार आहे.अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी घरी बसल्या काही मिनिटात आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. सर्व रेशन कार्ड धारकांनी आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया 31 मार्चच्या अगोदर करून घेणे गरजेचे आहे. जर केली नाही तर इथून पुढे रेशन धान्य हे मिळणार नाही. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती.

मुख्य वैशिष्ट्ये-

  • घरी बसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करता येणार आहे.
  • फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानामुळे झटपट पडताळणी होणार आहे.
  • याद्वारे रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो.
  • यासाठी आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे गरजेचे आहे.

ई-केवायसी करणे का गरजेचे आहे-

शिधापत्रिकेसोबत आधार क्रमांक संलग्न आहे की नाही तसेच शिधापत्रिकेतील व्यक्ती खरी असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी पूर्ण न केल्यास शिधापत्रिकेचा माध्यमातून मिळणाऱ्या अन्नधान्य पुरवठा बंद होणार आहे.

ई-केवायसी करण्याची पद्धत-  

  • घरी बसल्या रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन खालील दोन ॲप डाऊनलोड करायचे आहे.

अ‍) Mera E-KYC Mobile App येथे क्लिक करून डाऊनलोड करा किंवा गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन “Mera E-KYC” सर्च करून हे अ‍ॅप डाऊनलोड करा.

ब) Aadhaar Face RD Service App येथे क्लिक करून डाऊनलोड करा किंवा गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन “Aadhaar Face RD” सर्च करून हे अ‍ॅप डाऊनलोड करा.

  • त्यानंतर दोन्ही ॲप इन्स्टॉल करा व आवश्यक त्या परवानग्या द्या.
  • आता Mera E-KYC अ‍ॅप उघडा व पुढे दिलेल्या स्टेप फॉलो करा. राज्य- महाराष्ट्र निवडा. आधार क्रमांक टाकावा व आधारशी संलग्न मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकावा. कॅपच्या कोड टाकावा.
  • चेहऱ्याद्वारे पडताळणी करण्यासाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करून घ्यावा. स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार डोळ्याची  उघडझाक करावी. दुसऱ्या व्यक्तीची ई-केवायसी करण्यासाठी बॅक कॅमेराचा वापर करावा.
  • यशस्वी पडताळणी झाली तर लाभार्थ्यांची माहिती रास्त भाव दुकानांच्या ई-पॉस मशीनवर दिसणार आहे. तसेच याची खात्री करण्यासाठी अ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या “E-KYC Status” या पर्यायावर क्लिक करून तपसावे.जर “E-KYC Status-Y” दिसले तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अत्यंत महत्वाचे-

ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राबाहेरील स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा. तसेच ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2025 देण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी  लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी.

रास्त भाव दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ज्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित रहावे लागणार नाही. तसेच जर काही अडचण आली तर आपल्या रास्तभाव दुकान किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क: अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन, टोल फ्री क्रमांक: 1800-22-4950 व 1967, ई-मेल: helpline.mhpds@gov.in  

नोट– अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *