महाराष्ट्र राज्यातील लागवड योग्य जमीन कमी होत चालली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या व शहरीकरण. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन होत चालले आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच अनेक जण आता नवीन शेतजमीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. जर शेती करण्यासाठी त्याचबरोबर गुंतवणूक म्हणून शेतजमिनी खरेदी करण्याचा जर तुमचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये जमीन खरेदी संबंधित वेगवेगळे नियम लागू आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतजमीन खरेदीचे नियम नेमके काय आहेत? आपल्या राज्यामध्ये एक व्यक्ती जास्तीत जास्त किती शेतजमीन खरेदी करू शकतो? याबद्दलची आपण सदर लेखातून माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये सिलिंग कायदा कार्यरत आहे. या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असावी याबद्दल नियमामध्ये सांगण्यात आलेले आहे. तसेच जर या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या नावावर मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल तर सरकार ती संपादित करून इतर व्यक्तींना वाटप करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात ज्या लोकांच्या नावे आधीपासूनच शेत जमीन आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा-
जे लोक शेतकरी आहेत त्यांनाच शेत जमीन खरेदी करण्याचा अधिकार मिळतो. ज्यांच्याकडे सातबारा उतारा नाही, अशा लोकांना महाराष्ट्र राज्यात जमीन खरेदीचा अधिकार नाही. म्हणजेच राज्यात फक्त शेतकरीच जमीन खरेदी करू शकतो. जर शेतकऱ्या व्यतिरिक्त इतर लोकांना जर जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो, रीतसर परवानगी घ्यावी लागते. पण जमीन खरेदीला परवानगी द्यायची की नाही, हे जिल्हाधिकारीच ठरवतात.
किती जमीन खरेदी करता येते-
महाराष्ट्र राज्यातील एक शेतकरी जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो, याबाबतचा सिलिंग कायद्यातील नियम जाणून घेऊया. सिलिंग कायद्यानुसार बागायती शेती असेल तर म्हणजे ज्या ठिकाणी बारा महिने शेती केली जाते अशी बागायती शेती असेल तर एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 18 एकर जमीन खरेदी करता येते. जर शेती ही हंगामी बागायती असेल तर अशी शेतजमीन एक शेतकरी जास्तीत जास्त 36 एकर खरेदी करू शकतो.
म्हणजेच याचा अर्थ असा की एका शेतकऱ्याच्या नावावर जास्तीत जास्त 36 एकर हंगामी बागायती जमीन असू शकते. तसेच ज्या ठिकाणी बारा महिने पाणीपुरवठा नाही, पण एका पिकासाठी पाणीसाठा आहे, अशा ठिकाणी जास्तीत जास्त 27 एकर जमीन खरेदी करता येते. जर जमीन कोरडवाहू असेल तर एक शेतकरी जास्तीत जास्त 54 एकर एवढी शेती खरेदी करू शकतो. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एक शेतकऱ्याला जास्तीत जास्त 54 एकर एवढी शेती खरेदी करता येऊ शकते.
नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.