राज्यातील दस्त नोंदणी पाच दिवस बंद राहणार!

राज्यात शनिवारपासून (ता.12) क्लाऊड मायग्रेशनसाठी व्हर्च्यअल ट्रेझरीने 16 ऑक्टोबरपर्यंत ग्रॉस सर्व्हर प्रणाली बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पाच दिवस दस्तनोंदणी बंद राहणार आहे. शनिवारी(ता.12) व रविवार(ता.13) हे सुट्टीचे दिवस सोडून देता सोमवार(ता.14) ते बुधवार(ता.16) या दिवसापर्यत शेतजमीन, घर व जागा खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी करता येणार नाही. राज्यभरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्तनोंदणी राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क ग्रॉससर्व्हर प्रणालीद्वारे केली जाते.

व्हर्च्यअल ट्रेझरीने क्लाऊड मायग्रेशनसाठी 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत हे सर्व्हर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहदुय्यम निबंधकांना पुढे सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पाच दिवसाच्या या कालावधीत दस्तनोंदीबरोबर चलन तयार करणे, चलन पडताळणी किंवा चलन विरुपित करण्याची प्रक्रिया करता येणार नाही.

नोट- अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. तसेच वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *