आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील गरजू शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वकांक्षी योजना आहे. राज्य सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये DBT द्वारे पाठवले जातात.
त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एका वर्षात 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत मिळते. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 3 हप्ते देण्यात आलेले आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आज 4 था हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य शासनाच्या मार्फत नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्तासाठी शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याचा 2 हजार 41 कोटीचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
गेल्या पाच महिन्यापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष हे नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. तसेच या योजनेचा हप्ता हा येणार की नाही किंवा ही योजना बंद आहे की सुरू आहे अशा अनेक प्रकारच्या अफवा उडवण्यात आल्या होत्या. परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे,. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर पूर्णविराम लागलेला आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.