आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी आता अधिकचे अनुदान मिळणार आहे. शेतासाठी सिंचन हा एक महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी देखील सरकार अनुदान पुरवते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही देखील अशीच एक योजना आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर नवीन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत विहिरींचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आता लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ज्या विहिरी एप्रिल पासून मंजूर आहेत त्यांना हे अनुदान मिळणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर करता यावी व तसेच मजुरांना रोजगार मिळावा म्हणून या योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरींची काम करण्यासाठी अनुदानाचा लाभ देण्यात येतो. या योजनेसाठी पाच एकर क्षेत्राच्या आतील जमीन असलेले अल्पभूधारक शेतकरी पात्र ठरतात. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन वर्षांपूर्वी 2 लाख 90 हजार रुपयांवरून 3 लाख 90 हजार रुपये अनुदान देण्यात आले.
तेव्हापासून आत्तापर्यंत सुमारे 29 हजार 490 विहिरींची कामे पूर्ण झाली असून 1 लाख 55 हजार 164 विहिरींची कामे ही प्रगतीपथावर आहेत. या योजनेच्या माध्यमातून कामावरील मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात आलेली आहे. आता प्रतिदिन 297 रुपये मजुरी देण्यात येते. याशिवाय विहीर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. या दोन्ही बाबी विचारात घेऊन शासनाने विहिरीच्या अनुदानातही 4 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये एवढी वाढ केली आहे.
ज्या लाभार्थ्यांचे अर्ज हे एप्रिल 2024 पासून मंजूर झालेले आहेत, अशा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वाढीव अनुदान देण्यात येणार आहे, असा आदेश देखील शासनाच्या रोजगार हमी विभागाचे काढला आहे. अलीकडच्या काळातील महागाई तसेच मजुरीची वाढ पाहता अनुदानात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.