आरटीईच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेले आहे.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहोत. शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून म्हणजेच आरटीईच्या माध्यमातून खाजगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आता पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे अजूनही पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतलेला नसेल त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.

ही माहिती परिपत्रकाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाने फेब्रुवारीमध्ये केलेल्या बदलामुळे न्यायालयीन प्रकरण सुरू झाले होते. परंतु न्यायालयाने शिक्षण विभागाने केलेले बदल हे घटनाबाह्य ठरवले. त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीसारखीच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. न्यायालयीन प्रक्रिया ही सुमारे दोन महिने चालल्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रियेला उशीर झालेला आहे.

या वर्षी राज्यात 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या 2 लाख 42 हजार 516 अर्जातून 93 हजार 9 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रतीक्षा यादीत 71 हजार 276 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी 21 ते 31 जुलैपर्यंत मुदत दिली होती.

ही मुदत बुधवारी संपली. या मुदतीनंतर 39 हजार 408 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे. मात्र प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अजून आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतलेला नसेल त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *