राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्याचबरोबर सोयी- सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने घेतला आहे. जे वारकरी परंपरेने महिन्याची पायी वारी करतात त्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्ध काळात ‘वारकरी पेन्शन योजना’ सुरू करण्यात येणार आहे.
तसेच राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. या महामंडळामध्ये मुख्यालय हे पंढरपूर येथे असणार आहे. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या महामंडळाला 50 कोटीचे भांडवल देण्यात येणार आहे.
महामंडळाच्या योजना-
- या योजनेच्या माध्यमातून महामंडळामधील सर्व पालखी मार्गाची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करण्याचे नियोजन.
- तसेच आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुरक्षा विमा संरक्षण कवच
- भजन व किर्तन साहित्यासाठी वारकरी भजनी मंडळाला टाळ, मृदुंग, विणा आदी) साहित्यासाठी अनुदान
- कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना
- पंढरपूर, देहू आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्रिंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावता माळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास.
- चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी कार्यवाही बाबत.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.