आज आपण सदर लेखातून महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी,आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये इच्छुक महिलांना पिंक-ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक-ई-रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक-ई -रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी 10 हजार लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या योजनेबद्दलची सविस्तर माहिती.
सदर योजनेचा उद्देश-
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे आहे.त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील होतकरू मुली व महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे
- राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिकरणास चालना मिळावी.
सदर योजनेचे स्वरूप-
- ई-रिक्षाची किंमतीमध्ये सर्व करांचा समावेश असेल.
- नागरी सहकारी बँका/ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका/राष्ट्रीयकृत बँका/अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई -रिक्षा किंमतीच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
- राज्य शासन 20 टक्के आर्थिक भार उचलेल.
- या योजनेची लाभार्थी महिला/मुली यांच्यावर 10 टक्के आर्थिक भार असेल.
- कर्जाची परतफेड ही 5 वर्षे म्हणजे 60 महिने
सदर योजनेची लाभार्थी पात्रता-
- या योजनेचा लाभ घेणारे महिलेचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम हे 3 लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
- विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह/बालगृहातील आजी/माजी प्रवेशित यांना प्राधान्य दिले जाईल.
- तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल.
सदर योजनेच्या अटी व शर्ती-
- या योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला एकदाच घेता येणार आहे.
- लाभार्थी महिलेले शासनाच्या इतर विभागामार्फत व राबविण्यात येणाऱ्या ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी.
- कर्ज फेडीची जबाबदारी ही लाभार्थी महिलेची असणार आहे.
सदर योजना कोण कोणत्या शहरासाठी लागू असणार आहे-
मुंबई उपनगर
ठाणे
पुणे
नाशिक
नागपूर
कल्याण
अहमदनगर
नवी
मुंबई
पिंपरी
अमरावती
चिंचवड
पनवेल
छत्रपती संभाजी
नगर
डोंबिवली
वसई
विरार
कोल्हापूर
सोलापूर
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- ऑनलाईन अर्ज
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला (3 लाखापेक्षा कमी)
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मतदान कार्ड
- रेशन कार्ड
- चालक परवाना
- रिक्षा लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र
- अटी शर्ती पालन करण्याचे हमीपत्र
सूचना- या योजनेचा अर्ज अजून सुरू झालेला नाही. फक्त शासनाने GR जाहीर केलेला आहे. या योजनेचा अर्ज कोठे व कसा करावा याबद्दलची माहिती जेव्हा अर्ज सुरू होतील तेव्हा आपणास लेखातून कळवले जाईल.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.