शेतकरी सौर कृषी वाहिनी या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी हेक्टरी मिळवू शकतात सव्वा लाख रुपये.

आज आपण सदर लेखातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून त्यांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्यातील सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी देखील सुरू करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपली जमीन सरकारला भाडेतत्त्वावर देऊ शकतात व दरवर्षी हेक्‍टरी 1.25 लाख रुपये (तीन टक्के वार्षिक वाढीसह) मिळवू शकतात. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची सिंचन सुविधा उपलब्ध नाही. त्याचबरोबर ज्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत हवा आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास व राज्यात सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्यास मदत होईल.  

सदर योजनेचे फायदे-

  • नियमित उत्पन्न:- शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा ताबा न देता दरवर्षी स्थिर उत्पन्न मिळते.
  • वाढणी उत्पन्न:- या अगोदर योजनेच्या माध्यमातून 75,000 रुपये प्रति हेक्टर एवढे उत्पन्न दिले जात होते , त्या तुलनेत हे उत्पन्न जास्त आहे.
  • सौर ऊर्जा विकासाला चालना:- या योजनेच्या माध्यमातून राज्यात सौर ऊर्जा निर्मिती वाढण्यास मदत मिळते.
  • सरकारी व खासगी जमीन:- या योजनेसाठी शेतकरी सरकारी किंवा खासगी अशा दोन्ही प्रकारची जमीन देऊ शकतात.
  • कमीत कमी तीन एकर जमीन:- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी तीन एकर व जास्तीत जास्त पन्नास एकर जमीन भाड्याने देता येते.

सदर योजनेची पात्रता-

या योजनेचा लाभ महावितरण वीज केंद्राच्या पाच किलोमीटरच्या आत राहणारे शेतकरी घेऊ शकतात.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी  येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *