मायनस 44 टक्यांवर उजनी धरणाचा पाणीसाठा.

उजनी धरणाचा पाणीसाठा हा मायनस 44% झाला आहे. त्यामुळे सध्या स्थितीला सोलापूर, पुणे, नगर व धाराशिव या चार प्रमुख शहरांबरोबरच धरण क्षेत्रातील शेतीसाठीच्या पाण्यासाठीची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

धरणातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे येत्या काही दिवसात धरणातून पाणी उचलल्यास उजनी धरणातील पाणीसाठा हा इतिहासातील आत्तापर्यतचा निच्चांकी पातळीला पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाणीसाठा हा निच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता?

सध्या सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतेच यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत.

हे पाणी सोडले तर त्यानंतर उजनी धरणातील पाणी हे इतिहासातील निच्चांकी पातळीला पोहोचण्याची शक्यता आहे. उजनी धरणात सध्या मायनस 44% इतका पाणीपुरवठा शिल्लक आहे. जर आता सोलापूर शहरासाठी चार गाळ मोरीतून 6 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडले तर साडे पाच टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

50 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध-

धरणातील असलेले हे पाणी सोलापूरसह आसपासच्या भागाला पुढील 50 दिवस पुरवावे लागणार आहे. कारण यानंतर धरणातून पाणी सोडणे अशक्य होणार आहे.

सध्याच्या आदेशानुसार जर उजनी धरणातून पाणी सोडले तर आतापर्यंतच्या इतिहासात उजनी धरणातील हे सर्वात निच्चांकी पातळी म्हणजे वजा 60 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. पाच वर्षा अगोदर म्हणजे 30 जून 2019 साली उजनी धरणाचे पाणी हे वजा 58% पर्यंत निच्चांकी पातळीला गेले होते.

उजनी धरणाची सध्याची परिस्थिती-

पाणीपातळी – मायनस 44 टक्यांपर्यंत उजनी धरणाची पातळी सध्या कमी झाली आहे.

उपलब्ध पाणीसाठा- धरणात सध्या फक्त 66 टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

सरासरी पाणीपुरवठा- 5 ते 5.5 टीएमसी पाणीपुरवठा केला जातो.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *