50 हजार प्रोत्साहन अनुदानासाठी तब्बल 8.5 लाख शेतकरी अपात्र

महाराष्ट्र राज्यातील प्रोत्साहन अनुदानासाठी तब्बल 8.5 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. ही योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा भाग म्हणून देण्यात येते. प्रोत्साहन अनुदानासाठी अनेक शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया यामागील कारणे काय आहेत.

सदर अनुदानासाठी अपात्र ठरण्याची कारणे-

  • ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेण्याच्या व परतफेडीच्या अटींचे पालन नाही केले, असे शेतकरी.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तीन आर्थिक वर्षापैकी दोन वर्षातील कर्ज घेऊन परतफेड करणे गरजेचे होते.
  • ज्या शेतकऱ्यांनी एका वर्षात कर्ज घेऊन परतफेड केली आहे, असे 8.5 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत.
  • जे शेतकरी आयकरदाता किंवा नोकरी करत आहेत, असे 5 लाख शेतकरी यामुळे अपात्र ठरलेले आहेत.
  • उच्च उत्पन्न गटात असणारे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत.
  • इतर अपात्र निकष म्हणजे जे शेतकरी माजी मंत्री, आमदार, खासदार व इतर निवडक सरकारी अधिकारी व कर्मचारी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये पेक्षा जास्त पगार असेल, असे कर्मचारी अपात्र ठरलेले आहेत.

सदर अनुदानाचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे-

जरी एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र ठरले असले तरी 14.39 लाख शेवतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण 5216 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत.या अनुदानासाठी एकूण 28.6 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यामधुन 14.93 लाख शेतकरी पात्र ठरले होते.

प्रोत्साहन अनुदान योजनेचे पुढील नियोजन-

सरकारने 1000 कोटी रुपये वितरित करण्याचे अजून बाकी ठेवले आहे. या योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली जाईल, याबाबतच्या निर्णयाबाबत अजून काही स्पष्टता दिलेली नाही.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *