आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. बँकेतून शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्यासाठी 3 ते 4 आठवडे वाट पहावी लागत होती. परंतु आता ती वाट पहावी लागणार नाही. कारण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBI शाखेसोबत करार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता फक्त 5 मिनिटात कर्ज मिळणे शक्य झाले आहे.
या कराराच्या माध्यमातून नाबार्डने विकसित केलेले ई-केसीसी लोन प्लॅटफॉर्म रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या(RBIH) पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शेनलेस क्रेडिटशी (PTPFC) जोडला जातो. या कराराच्या माध्यमातून डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यासाठी नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी हे क्रेडिट सिस्टीम प्लॅटफॉर्म तयार केले आहे.
यामुळे अॅग्री लोन प्रक्रियेतील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे व शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळणार आहे. यामुळे नाबार्डचे ग्रामीण समृद्धीला देखील चालना मिळणार आहे असे नाबार्डचे अध्यक्ष शहाजी के.व्ही यांनी म्हटले आहे.
कर्ज प्रक्रियेत काय सुधारणा होतील–
- या करारामुळे कर्जाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम व पारदर्शक बनेल.
- तसेच शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे व महत्त्वाची माहिती त्वरित ऑनलाईन सबमिट करता येईल.
- कर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ अगोदर पेक्षा कमी होईल व तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या अर्जाची अद्यवत स्थित तपासता येईल.
सदर कराची माहिती-
- या करारावरती नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बंसल यांनी स्वाक्षरी केली आहे.
- त्यांच्या मते या भागीदारीमुळे देशातील 12 कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप कालवधी हा 3 ते 4 आठवड्यावरून फक्त 5 मिनिटांवर येणार आहे.
- त्यामुळे हा करार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे व त्यांना वेळेवर व सहजरीत्या कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.