आज आपण सदर लेखातून रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयानुसार अंत्योदय अन्य योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात खालील वस्तूनचे वाटप करण्यात येणार आहे.
- रवा- 1 किलो
- चणाडाळ- 1 किलो
- साखर- 1 किलो
- सोयाबीन तेल- 1 लिटर
हा प्रतिसंच प्रत्येकी रुपये 100 दराने वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी दिली गेली आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.