पिक कर्ज काढले असेल तर आता व्याज भरण्याची आवश्यकता नाही? जाणून घेऊया शासनाचा निर्णय.

आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. यापूर्वी जर आपण पीक कर्ज घेतलेले असेल तर आता आपल्याला व्याज भरण्याची गरज नाही आहे. कारण शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती.

जर आपण पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतले असेल तर ते आपण 31 मार्च अगोदर भरावे. आपण घेतलेल्या पीक कर्जावर जर आपल्याला व्याज लागले असेल तर आता ते भरण्याची गरज नाही आहे.

व्याज भरण्याची आवश्यकता का नाही?

जर आपण आपले काढलेले कर्ज नियमित भरत असूत तर शासनाकडून वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या योजना लागू होत असतात. असाच एक शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. येथून पाठीमागे देखील आपण 31 मार्चच्या अगोदर आपले पीक कर्ज भरत होता. तसेच व्याजाची रक्कम देखील भरत होता. जी रक्कम आपण व्याज म्हणून भरली आहे, ती आपल्याला परत महिन्याभराच्या कालावधीमध्ये मिळत होती. एखाद्या वेळेस ही रक्कम मिळण्यासाठी एक-दोन किंवा सहा महिन्याचा देखील कालावधी लागत असे.

परंतु सध्या स्थितीला आपण फक्त जे कर्ज काढले आहे तीच रक्कम आपल्याला भरायचची आहे. आपल्याला व्याजाची रक्कम भरण्याची गरज नाही कारण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून पुणे जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या सूचना सादर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला फक्त मुद्दल भरायची आहे. म्हणूनच सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की 31 मार्च अगोदर पीक कर्जाची रक्कम भरून व्याज सवलतीचा फायदा घ्यावा. जर आपणास अधिक माहिती हवी असेल तर आपण आपल्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाऊन भेट द्यावी.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *