जर दुष्काळग्रस्त ई-केवायसी करूनही पैसे आले नाहीत तर लगेच करा हे काम.

शेतकऱ्यांचे दुष्काळ व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ई-केवायसी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे, तरी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आपण सांगितलेले खालील काम करावे.  

कोणत्या शेतकऱ्यांचा खात्यात पैसे जमा झाले आहेत?-

ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, त्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्याला पीएम मोदीचे पैसे ज्या बँक खात्यात येत होते त्या बँक खात्यात देखील रक्कम जमा झालेली आहे.

ई-केवायसी करण्यासाठी काय आवश्यक आहे-

ई-केवायसी करण्यासाठी फक्त एक विशिष्ट क्रमांकाची गरज आहे. तो क्रमांक आपल्याला आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जी यादी आहे त्यात मिळेल.

ई-केवायसी घरबसल्या मोबाईलद्वारे करता येऊ शकते का?-

ई- केवायसी घरबसल्या मोबाईलद्वारे करता येऊ शकणार नाही. कारण की  ही ई-केवायसी प्रक्रिया फक्त महा-ई-सेवा केंद्र चालकच करू शकतात.

जर पैसे जमा झाले नाही तर लगेच करा हे काम-

ज्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडायचे आहे. खाते उगडल्या नंतर त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम पुढील 3 दिवसांमध्ये जमा होईल.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *