मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार

  • जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी मराठी आरक्षण आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. अश्रुधुराचा नळकांड्या फोडल्यारबरी गोळ्या झाडल्या गेल्या.
  • या घटनेत अनेक पोलीस आणि ग्रामस्थ जखमी देखील झाली. यामुळे राजकीय वातावरण चांगले तापलेले आहे. जालन्यात जाळपोळ आणि दगडफेकेत एकूण 16 ज्ञात तर 300 ते 350 अज्ञात लोकांवरती गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. कलम 307 आणि 333 अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच बरोबर इतर गावात आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. संतप्त आंदोलकांनी ट्रक देखील जाळली. हवेत गोळीबार देखील आंदोलकांचा जमाव आक्रमक झाल्याने करण्यात आला.
  • जालना जिल्ह्यात पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराने राज्यात अनेक जिल्ह्यात शनिवारी तीव्र पडसाद उमटले. राज्य सरकारच्या विरोध असताना देखील रास्ता रोको, निषेध मोर्चे, बंद अशी आंदोलने करण्यात आली.
  • संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी स्वतःच्या गाडीवर पेट्रोल टाकून मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवला. याआधी गट विकास अधिकाऱ्यांनी विहित मंजुरीसाठी लाच मागितल्याने, त्यांनी फुलंब्री पंचायत समिती समोर नोटा फेको आंदोलन केले होते. त्यांनी काल झालेल्या मराठा आंदोलकांनवर पोलिसांनी मारहाण केली याचा निषेध म्हणून स्वतःचा कारवर पेट्रोल टाकून कार पेटवली आणि आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला.
  • माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी जालन्यातील घटनेवर निषेध व्यक्त केला. आंदोलकांवर गोळीबार कसा करता?  ते पाकिस्तानी किंवा दहशतवादी आहेत का? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. तुम्ही पोलिसांच्या लाठीचार्जचे समर्थन कसे करू शकतात असे त्यांनी विचारले.
  • उद्धव ठाकरे हे युवा सेनेचा कार्यक्रमात बोलत असताना म्हणाले, की या आंदोलनावर लाठी चार्ज करण्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. मला माहिती मिळाली आहे, की तिकडे सरकारला “आपल्या दारी थापा मारत लयं भारी” हा कार्यक्रम घ्यायचा होता. आंदोलन करत्याना तेथून उठवायचं होतं. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज करण्यात आला आहे असा दावा त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली गेली.
  • शरद पवार यांनी देखील लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या आंदोलकांशी बोलणी केली. शांततेच्या मार्गाने संघर्ष करण्याचे आव्हान त्यांनी केले.
  • आंदोलकांच्या भावनेची कदर करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून आंदोलकांनी राज्यात कोठेही कायदा हातात घेऊ नये, तसेच जाळपोळ, हिंसाचार याला खतपाणी घालू नये. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत या प्रश्नी चर्चा करून तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

नोट-जर वरील माहिती आपणास आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद !

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *